Tuesday, May 25, 2010

तक्रार .. कशाला?


गेल्या आठवड्यात पारा रोज रोज half century ठोकत होता. सगळेच अतिशय त्रस्त होते ..
मनात कानपूरला असंख्य नावं ठेवून झाली आणि काही विचार मनात डोकावून गेले..

असं कसं सगळंच विचित्र ?
उन्हाळ्यात कूलर, हिवाळ्यात हिटर,
एरवी सदैव पंख्याची घरघर

पाऊस कधी पडतच नाही,
पडला कधी तर थांबायचं नाव नाही
पण गारवा आणणारा पाऊस कधी येणारच नाही

समुद्र नाही तरी टपटप घाम,
डोंगरावर नाही पण हुडहुडी जाम,
वार्‍याची झुळूक मात्र कधी सुद्धा नाही

त्या झोपडीतले लोकही राहतातच की असेच,
जरी लोडशेडिंग दिवसभर अन्‌ पाणी येत नसे,
सवयच लागलीय आपल्याला तक्रार करायची,
जरी कुणीही ऐकून घेत नसे ...

तक्रार नाही केली तर वाटेल का सगळं छान ?
नुसता विचार तरी करु एक महान ..

2 comments: