परवा रस्त्यात पेप्सीकोला खाऊन तोंड लाल-गुलाबी झालेली चिल्ली-पिल्ली दिसली आणि मला सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या..
पेप्सीकोल्याचे वेगवेगळे प्रकार, त्याच्या जोडीला आइसक्रीम, सायकलवरून केलेल्या रपेटा, सकाळी सकाळी विहिरीत पोहणं, मातीत पडली म्हणून धुऊन खाल्लेली कुल्फी, एकदम मस्त फुगत आलेला पण शेवटी हवा जाऊन फुस्स झालेला ओव्हन मधला पहिला केक, swimming tank च्या बाहेर मिळणार मीठ घातलेलं आइसक्रीम, दुपारपर्यंत काढलेल्या साखरझोपा, संध्याकाळी भेळेचा कार्यक्रम, रात्री अंगणात सडा घालून जमलेल्या जेवायच्या पंगती,कधी आमसुलाच सार,कधी सोलकढी, चुलीत भाजलेली मातीची भांडी आणि रॉकेलच्या वासाचे बटाटे..
आठवणीच इतक्या सुंदर आहेत की बाहेरचं ऊनही कमी झाल्यासारखं वाटतंय!
chann :) ..short and sweet :)
ReplyDeleteकमी शब्दात मनाला भिडणार अस लिहील आहे. आठवणी खरंच अशा सुखद असतात.त्या मिळवाव्या तितक्या कमी ..
ReplyDeletePost Avadli !!! sundar varnan kela aahes :)
ReplyDeleteSagla asa distay smaor...Chan..khupach Chan..Rohit Kulkarni
ReplyDelete